अजय टोप्पो आत्महत्या प्रकरणाची राज्य सरकारने घेतली गंभीर दखल : जयश्री वेळदा, शेकाप यांचा दावा खोटा.

0
383

लोकवृत्त न्यूज 
गडचिरोली दि.२१ सप्टेंबर :- एट्टापल्ली तालुक्यातील मौजा मलमपाडी येथील शेतकरी अजय टोप्पो यांच्या आत्महत्या प्रकरणी शेतकरी कामगार पक्षाच्या महिला नेत्या जयश्री वेळदा यांनी राज्य मानवी हक्क आयोग आणि राज्याचे मुख्य सचिवांकडे तक्रार करुन जिल्हाधिकारी संजय मिणा आणि अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी ८ सप्टेंबर रोजी केली होती. या तक्रारीची गंभीर दखल घेत राज्याच्या मुख्य सचिवांनी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत.

दरम्यान गडचिरोलीचे जिल्हाधिकारी संजय मिणा यांनी अजय टोप्पो यांची आत्महत्या हि घरगुती वादातून झाली असल्याचे प्रसिध्दीपत्रक काढून स्पष्टीकरण दिले होते . मात्र आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटूंबियांनी गडचिरोली येथील पत्रकार परिषद घेऊन आपले मत जनतेसमोर मांडले होते व सुरजागड लोह खाणीतून आलेला गाळाने झालेले शेतीचे नुकसान आणि संजय मिणा यांनी दिलेली असंवेदनशीलपणाची वागणूक यामुळेच आत्महत्या केली असल्याचा दावा केला होता.

जयश्री वेळदा , शेतकरी कामगार पक्ष यांनी शासनाने उच्च स्तरीय चौकशीची मागणी केली होती. या संदर्भात महाराष्ट्र शासनाने आदेश दिले असून आत्महत्याग्रस्त शेतकरी अजय टोप्पो यांच्या कुटूंबियांना न्याय मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. असा दावा शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने करण्यात येत आहे.

तक्रार कारवाई करीता विश्वास नांगरे पाटील यांच्याकडून आली.अशा अद्याप, कोणत्याही प्रकारचे उत्तर प्राप्त झाले नसल्याचे सूत्रांनी सांगितले.
शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने देण्यात आलेली प्रेस नोट खोटी असल्याचे समजते.

माझ्या विरुध्द कुठलीही चौकशीचे आदेश काढलेला नाही… जिल्हाधिकारी संजय मीणा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here