गडचिरोली जिल्ह्यातील पातानील येथील हत्तीचे गुजरात ला स्थालांतर

0
339

– गणेशोत्सवा दरम्यान हत्तींचे काळोखात स्थलांतर केल्याने गडचिरोली जिल्हयातील नागरिकांच्या भावना दुखावल्या

लोकवृत्त न्युज
गडचिरोली, २ सप्टेंबर :- जिल्हयातील पातानील येथील हत्तींचे गुजरातला आज २ सप्टेंबरच्या मध्यरात्री काळोखाच्या अंधारात एका बंदिस्त वाहनातून स्थलांतर केल्याची माहिती समोर आली आहे.
एकीकडे संपुर्ण राज्यात गणोशोत्सव साजरा करण्यात येत असतांना या दरम्यान गडचिरोली जिल्हयातील पातानील येथील हत्तीचे स्थलांतर काळोखाच्या अंधारात स्थलांतर केल्याने जिल्हयातील नागरिकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. तसेच काळोखाच्या अंधारात हत्तीचे स्थलांतर केल्याने नागरिकांच्या वतीने वेगवेगळया प्रतिक्रीया उमटतांना दिसत आहेत तसेच तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
राज्यात एकमेव असे हत्तीकॅंम्प गडचिरोली जिल्हयातील कमलापूर येथे आहे. कमलापूर तसेच पातानील येथील हत्ती गुजरातमधील झु पार्क मध्ये स्थलांतरीत करण्यात येणार होते. या करिता जिल्हयातील अनेक संघटना तसेच नागरिकांनी विरोध दर्शविला होता मात्र शासनाच्या आदेशाने सदर हत्ती गुजरातला स्थलांतर करण्यात येणार होते. ताडोबा येथील हत्ती काही महिन्यापूर्वी स्थलांतरीत करण्यात आले होते. गडचिरोली जिल्हयातील हत्तीचे स्थलांतर होणे बाकी होते. मात्र ऐन गणेशोत्सव काळात रात्रोच्या काळोखात हत्तींचे स्थलांतर केल्याने नागरिकाच्या भावना दुखावल्या असून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.

– पातानील येथील हत्ती

गडचिरोली जिल्ह्यातील व्यापारदृष्ट्या अहेरी तालुका सर्वाधिक विकसित भाग आहे. या तालुक्यातील आलापल्ली या गावापासून ४ किमी अंतरावर पातानील गणेश मंदिर आहे. आलापल्ली भागातील सागवान हे जगातील उत्तम दर्जाचे सागवान समजले जाते. १९८० च्या दशकात हे सागवान लाकूड व्यावसायिक पद्धतीने तोडणी व विक्री करण्यासाठी मुलभूत वाहक म्हणून हत्तींचा वापर केला जात होता. १९८१ साली या भागात वन विभागाच्या अखत्यारीत ४ हत्ती होते. कापलेले सागवान जंगलाबाहेर आणण्याच्या रोजच्या कामावर हत्ती नेमले असताना यातील एक हत्ती जंगलात बेपत्ता झाला. २ दिवस उलटूनही या किर्र जंगलात त्याचा काही पत्ता लागेना. शेवटी वन विभागाच्या शोध मोहिमेतील कर्मचारी व मजुरांनी बाप्पाच्या चरणी साकडे घातले. ” हत्ती सापडू दे, ११ पोती नारळ फोडू ” आणि काय आश्चर्य काही क्षणातच हरविलेल्या हत्तीची किंकाळी मजुरांच्या कानी आली. मजुरांनी आवाजाच्या दिशेने धाव घेतली. तेव्हा लक्षात आले की हत्तीच्या गळ्यातील साखळदंड एका दगडाला अडकले आहेत. ते काही केल्या निघेनात. शेवटी जोर लावून हा दगड बाहेर काढला गेला. बघतात तर काय चक्क या दगडाला श्री गणेशाचे रुपडे होते. या पद्धतीने वन विभागावरील संकट गणरायानेच दूर केले, म्हणून वनविभागाच्या अधिकारी, कर्मचारी व मजुरांनी एकत्र येत ही मूर्ती साफ करून तिची प्राणप्रतिष्ठा केली.
हा सर्व प्रकार एखाद्या चमत्कारापेक्षा काही कमी नव्हता. आता पातानीलचा गणपती हा नवसाला पावणारा गणपती म्हणून प्रसिद्ध पावला आणि ते हत्ती सुद्धा तिथेच राहू लागले. आलापल्ली येथे कोणताही सण असो आधी त्या ३ हत्तींचे दर्शन व पूजा मगच सण साजरी करतात. पातानिल येथील हत्ती कधीच गावकऱ्यांवर हिंसक झाले नाही . मात्र आता शासन त्या तीनही हत्तींना गुजरात येथील खाजगी प्राणी संग्रहालयात हलविणार आहे. हत्तींना इतर राज्यात हलविण्यापेक्षा एक मिनी एलिफंट पार्क पातानील येथे उभारा अशी मागणी टायगर ग्रुप टायगर्स यूथ बहुद्देशिय विकास स्वयंसेवी संस्था गडचिरोली जिल्हा ने केली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here