जाती- धर्मामध्ये अराजकता माजवण्याचे काम केंद्रसरकारचे – माजी आमदार डॉ नामदेव उसेंडी

0
196

नागपुर येथील आंदोलनात महाराष्ट्र प्रदेश आदिवासी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ नामदेव उसेंडी यांच्या नेतृत्वात गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती

लोकवृत्त न्यूज
नागपुर २ एप्रिल: – सर्वसामान्य नागरिकांचा आवाज दाबण्याच काम मोदी सरकार करत आहे. देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष पूर्ण झाली आहेत. भाजपाचे सरकार येऊन नऊ वर्ष झाली तरी त्यांच्या कार्यकाळात प्रचंड महागाई वाढली आहे. जाती- धर्मामध्ये अराजकता माजवण्याचे काम हे सरकार करत आहे. असा आरोप कदम यांनी केला. पुढे ते म्हणाले की, या देशात केवळ एकच काम सुरू आहे. हम दो हमारे दो, म्हणजे मोदी आणि शहा आणि अदानी आणि अंबानी. याभोवती देशाचं राजकारण सुरू आहे. पुढे ते म्हणाले की, सर्व जाती धर्माचे लोक, शेतकरी यांना एक संघ ठेवण्याचे काम भारत जोडो यात्रेतून राहुल गांधीने केले. कन्याकुमारी ते काश्मीर पर्यंत राहुल गांधींच्या पद यात्रेला भरगोस प्रतिसाद मिळाला म्हणून हे भाजपा सरकार घाबरले आहे. राहुल गांधींमध्ये बलिदानाचे रक्त आहे. काँग्रेसमध्ये बलिदानाची परंपरा आहे. यातून च हा काँग्रेस पक्ष तयार झाला आहे असते म्हणाले आहेत.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या निर्देशानुसार अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीचे नेते तथा खासदार राहुल गांधी यांच्या वाढत्या लोकप्रियतेला घाबरून, भाजप सरकारने सूडबुद्धीने त्यांची खासदारकी रद्द केल्याच्या निषेधार्थ नागपूर येथील संविधान चौकात एस टी, एस सी, ओबीसी, मायनोरिटी सेल च्या वतीने भाजपा सरकारच्या निषेधार्थ भव्य धरणे आंदोलन करण्यात आले.
तर, आदिवासी काँग्रेसचे राष्ट्रिय अध्यक्ष ॲड शिवाजीराव मोघे म्हणाले की, राहुल गांधींच्या खासदारकीचे सदस्यत्व रद्द झाले हे पाहता हा देश हुकूमशाहीच्या दिशेने वाटचाल करत आहे. २०२४ ची निवडणूक ही हुकूमशाही विरुद्ध लोकशाही अशी होईल. सरकार च्या विरोधात जो बोलतो तो देशद्रोही ठरतो आहे. अशा पद्धतीने वातावरण या देशात या आगोदर कधीही नव्हते. भारतीय संविधान या गोष्टीना मान्यता देत नाही. पक्ष आणि देश या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. पक्षाविरोधात बोललं म्हणजे देशाविरोध बोलणं हे कधी पासून व्हायला लागल? अस म्हणत त्यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.
यावेळी आदिवासी काँग्रेसचे राष्ट्रिय अध्यक्ष ॲड शिवाजीराव मोघे, महाराष्ट्र प्रदेश आदिवासी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ नामदेव उसेंडी, ओबोसी सेलचे राष्ट्रीय समन्वयक गोविंद भेंडारकर, ओबीसी काँग्रेसचे उपाध्यक्ष राजाभाऊ चिलाटे, अल्फसंख्यांकचे नेते वसीम खान, काँग्रेस नेते जेसा मोटवानी, चिमूर विधानसभा क्षेत्राचे ओबीसी युवा नेते, फजल रहमान, अनु जाती काँग्रेसचे राहुल घरडे, प्रदीप मसराम, दशरथ मडावी, संजय दुधे, दिलीप मडावी, गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी काँग्रेसचे अध्यक्ष छगन शेडमाके, काँग्रेसचे उपाध्यक्ष अनिल कोठारे, प्रा दौलत धूर्वे, पिंकु बावणे, मनोज ढोरे, पुरुषोत्तम गेडाम, संजय गावडे, पंकज खोबे, दत्तात्रेय करंगामी, किशोर चापले विदर्भातील काँग्रेसचे विविध सेलचे अध्यक्ष, प्रतिनिधि उपस्थित होते.
हे सरकार म्हणजे हम दो हमारे दो असे आहे. (नरेंद्र मोदी आणि अमित शहा, अदानी आणि अंबानी) अशी टीका केली आहे. सर्वसामान्य नागरिकांचा आवाज दाबण्याचा काम मोदी सरकार करत आहेत असा आरोप देखील महाराष्ट्र प्रदेश आदिवासी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ नामदेव उसेंडी केला. पहिले लडे थे गोरे से अब लडेंगे चोरो से अशी घोषणाबाजी आंदोलनकर्त्यांनी दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here