नागरिकांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळवुन देण्यासाठी तत्पर : कंकडालवार

0
85

लोकवृत्त न्यूज
अहेरी २७ जून : आदिवासी विद्यार्थी संघाचे काम हाताळण्यात व शासनाची विविध विकास कामे जनतेपर्यंत पोहोचवण्यात आपल्या तालुक्यातील दुर्गम भागातील कार्यकर्त्याच्या मोलाचा वाटा आहे. याचा आम्हाला अभिमान असून जिल्ह्यातील व तालुक्यातील सर्व शासनाच्या योजनांचा लाभ समाजातील शेवटच्या नागरिकांना मिळतो की नाही याची माहिती पोहोचवून त्यांना त्या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी आपले कार्यकर्ते तत्पर आहेत, असे प्रतिपादन जिल्हा परीषदेचे माजी अध्यक्ष अजय कंकडालावार यांनी केले.
भामरागड तालुक्यातील ताडगाव येथे आदिवासी विद्यार्थी संघ व ग्रामसभेच्या वतीने मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी आदिवासी विद्यार्थी संघटनेचे सरसेनापती नंदू नरोटे होते. पुढे मार्गदर्शन करताना अजय कंकडालवार म्हणाले की, जे कार्यकर्ते आपला वेळ देऊन संघटनेचे काम वाढवित आहेत त्यांचे काम कौतुकास्पद आहे. शासनाच्या योजनांचा लाभ मिळाला की नाही, त्यांना योजनेचा लाभ कसा मिळवून देता येईल यासाठी प्रयत्न करावे व स्वतः पुढाकार घ्यावा व संघटन तालुक्यातील ग्रामीण परिसरात वाढविण्यासाठी परिश्रम घ्यावे, असे आवाहन त्यांनी केले. अनेक वर्षांपासून मी गडचिरोली जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात अविसं संघटनेचे काम करत आहे, सर्वांना काम करताना अनेक अडचणीचा सामना करावा लागत असतो. परंतु संघटनेसोबत नागरिकांनासुद्धा वेळ देणे गरजेचे आहे. जिल्ह्यातील व तालुक्यातील सर्वसामान्य गोरगरीब जनतेपर्यंत सरकारच्या योजना पोहचवण्यासाठी पुढाकार घ्यावा. आज अनेक गावांत सुंदर रस्ते झाले आहेत,मी या क्षेत्रांतून निवडून आलो नव्हतो मात्र जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पद माझ्याकडे होते. त्यामुळे आज हक्काने सांगतो की, या जिल्ह्यात व तालुक्यात सर्वाधिक निधी आणून विकासाचे कामे करता आले. त्यात आरोग्य,शिक्षण,पाण्याच्या समस्या व वैयक्तिक अडीअडचण असेल तर नेहमी मदत केली. आगामी काळात नेहमी तुमच्या सोबत उभा राहण्यासाठी तत्पर आहे, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. नंदू नरोटे म्हणाले की, आविसंने अनेकांना राजकीय क्षेत्रात मोठ्यामोठ्या पदांवर पोचवण्यासाठी दिवसरात्र मेहनत करून आज जिल्ह्यात एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे. आदिवासी विद्यार्थी संघटना ही आजही अन्याय अत्याचाराविरोधात सर्व घटकांसोबत उभे राहून आपल्या हक्क मिळवून देण्यासाठी तत्पर आहे, असेही ते म्हणाले. आविसं ही संघटना लहान लहान कार्यकर्त्यांना सोबत घेऊन आदिवासी विद्यार्थ्यांवर होणारे अत्याचार, अन्यायाविरोधात अनेक आंदोलने, मोर्चे, उपोषणे केली. अनेक कार्यकर्त्यांवर गुन्हे नोंद होताना जिवाची पर्वा न करता समस्यांना वाचा फोडली, असे नंदू नरोटे म्हणाले. यावेळी नगरपंचायतीचे उपाध्यक्ष विष्णू मडावी, माजी सभापतीलालसू आत्राम, नगरसेवक सर्जू सडमेक, नगरसेवक राकेश महाका, तपेश हलदर, दिलीप उईके,,नंदू मट्टामी, श्रीराम हेडो, प्रज्वल नागुलवार, आविसं व अजयभाऊ मित्र परिवाराचे भामरागड तालुकाध्यक्ष सुधाकर तिम्मा, नगराध्यक्ष रोजा करपेत, शैलेश पटवर्धन, अजय नैताम, सुनिता कुसनाके, भास्कर तलांडे, सुरेखा आलाम, नौरास शेख, प्रशांत गोडशेलवार, सरपंच दिलीप मडावी,अशोक येलमुले, महेश लेकुर, प्रमोद आत्राम, नरेंद्र गर्गम,कमला कुरसाम, नीलेश वेलादी, सीताराम मडावी, किरण कोरेत, डॉ.सत्तमवार, संजय येजुलवार,अनिल करमरकर तसेच आविसं व ग्रामसभा तथा अजयभाऊ मिञपरिवाराचे कार्यकर्ते उपस्थित होते. या मेळाव्यासाठी माजी उपसभापती लालसू आत्राम, जगदीश कोंकमुट्टीवार यांनी सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here