रक्तदान ही राष्ट्रहिताची संधी आहे
मनुष्याने विज्ञानाच्या क्षेत्रात अनेक महत्वपुर्ण शोध घेतले आहेत, घेत आहेत आणि यश मिळवित आहेत. जगाला कुठून कुठे पोहचवले आहे. परंतु काही नैसर्गिक गोष्टी आहेत. ज्या विज्ञानाने अद्याप तयार केल्या नाहीत, त्यापैकी एक म्हणजे रक्त. आजही विज्ञानाला कोणत्याही प्राण्याली वाचवण्यासाठी रक्ताची आवश्यकता भासल्यास ते दुसज्या स्वस्थ जिवातुन घेतले जाते. हे केवळ निसर्गाची अद्भुत निर्मिती आहे. म्हणुनच मेंदुला निरंतर मिळणाज्या ऑक्सिजनयुक्त रक्तप्रवाहामुळे सजीवांना जिवंतपणा लाभला आहे. रक्त हे कुठल्याही कारखाण्यात किंवा कृत्रिमरीत्या तयार होत नाही. त्यामुळे रक्तदानाशिवाय दुसरा पर्याय नाही. त्याअर्थी रक्तदान श्रेष्ठदान, महादान आहे. रक्तदान हे अनेक कारणांमुळे इतर प्रकारच्या दानांपेक्षा श्रेष्ठ मानले जाते. प्रथम, ते आपत्कालीन परिस्थितीत, शस्त्रक्रिया आणि जुनाट आजार असलेल्या रुग्णांसाठी थेट जीव वाचवते. दुसरे म्हणजे. रक्तदान ही एक सोपी आणि सुरक्षित प्रक्रिया आहे जी वारंवार केली जाऊ शकते, ज्यामुळे रक्तदाते नियमितपणे योगदान देऊ शकतात.
नियमित, ऐच्छिक आणि विनाशुल्क रक्तदानाची सतत गरज भागवणाज्या रक्तदात्यांचे जीव वाचवण्यामध्ये व सार्वजनिक आरोग्य सुधारणेत अमुल्य असे योगदान आहे., अशा निस्वार्थी रक्तदान करणाज्या रक्तदात्यांच्या सन्मानार्थ दरवर्षी 14 जुन रोजी “जागतिक रक्तदाता दिन” म्हणुन उत्साहात साजरा केला जातो. त्यान्वये भारत या वर्षी या जागतिक रक्तदाता दिनाचे औचित्य साधुन जागतिक समुदायासोबत सामील होऊन रक्त द्या, आशा द्या: एकत्रितपणे आपण जीव वाचवू ! या मोहिमेचा भाग बनत आहे.
रक्तदान ही एक संधी आहे, जी रक्तभिसरण क्रिया सुधारुन रोगप्रतिकार शक्ती वाढवते, टायफाईड, काविळ, रक्तदाब, ह्रदयविकार, लकवा, वात यांसारख्या अनेक आजारांपासुन दुर राहण्याची ! रक्तदान आणि राष्ट्रहित यांचा जवळचा संबंध आहे. रक्तदानामुळे अनेकांचे प्राण वाचवले जाऊ शकतात. त्यामध्ये कर्करोगग्रस्त, सिकलसेलग्रस्त, थॅलेसेमियाग्रस्त, अपघातग्रस्त, अॅनिमीयाग्रस्त, गरोदर माता इ. म्हणुनच रक्तदान ही एक अशी संधी आहे. ज्यामुळे आपण समाजासाठी आणि राष्ट्रासाठी रक्तदानाच्या माध्यमातुन मोलाचे योगदान देऊ आपले नांव सुवर्ण अक्षरात लिहु शकतो.
रक्तदान ही खरोखरच एक महत्वपुर्ण आणि उदात्त कृती आहे. रक्तदान केल्याने अनेकांचे प्राण वाचवले जातात आणि समाजातील गरजु लोकांना मदत केली जाते. रक्तदान ही अशी संधी आहे, ज्यांमुळे आपण आपल्या समाजासाठी आणि राष्ट्रहितासाठी सकारात्मक करु शकतो. रक्तदान ही एक स्वेच्छेने केलेली कृती आहे. जिथे व्यक्ती गरजु रुग्णांना मदत करण्यासाठी त्यांचे रक्तदान करते, हे निस्वार्थ कृत्य तिन लोकांचे नक्कीच प्राण वाचवू शकते, वैद्यकीय उपचारांना पाठिंबा देऊ शकते आणि विविध वैद्यकिय प्रक्रियांमध्ये मदत करु शकते. रक्तदान ही एक सुरक्षित आणि सोपी प्रक्रिया आहे. ज्यामध्ये पात्र रक्तदात्यांना त्यांच्या रक्ताचा काही भाग दान करावा लागतो, जो नंतर इतरांना मदत करण्यासाठी वापरला जातो. रक्तदान करुन व्यक्ती त्यांच्या समुदायात महत्वपुर्ण बदल घडवू शकतात आणि इतरांच्या कल्याणासाठी योगदान देऊ शकतात.
रक्तदानामुळे रुग्णालयांमध्ये रक्ताचा साठा अधिक प्रमाणात वाढतो व गरजु रुग्णांना योग्य वेळी रक्त मिळतो. ज्यामुळे रुग्णाचे जीव वाचवले जाते. रक्तदान ही एक छोटी कृती असली तरी मोठा फरक पाडु शकते. आपण सर्वांनी रक्तदान करण्याचा संकल्प करुन समाजातील इतरांनाही रक्तदान करण्यासाठी प्रेरित करावे. रक्तदान ही एक संधी आहे ज्यामुळे आपण समाजातील एक महत्वाचा भाग बनू शकतो आणि इतरांना मदत करु शकतो. रकतदानाच्या महत्वाबाबत जागरुकता निर्माण करणे आणि अधिकाधिक लोकांना रक्तदानासाठी प्रोत्साहित करणे आवश्यक आहे. चला रक्तदान करुया, इतरांना रक्तदान करायला लावूया आणि राष्ट्रहित जपुया.
रक्त द्या, आशा द्या: एकत्रितपणे आपण जीव वाचवू ! या मोहिमेचा भाग म्हणुन आपण सर्वांनी या जागतिक रक्तदान दिनापासुन एक संकल्प करुया, चला रक्तदान करुया…. राष्ट्रहितासाठी एक तुमच एक आमच पाऊल टाकु या।
।। समस्त रक्तदात्यांना जागतिक रक्तदाता दिनाच्या प्रेरणादायी व हर्षोउल्हास शुभेच्छा।।
लेखक
आकाश प्रभाकर आंबोरकर
कोषाध्यक्ष, स्वयं रक्तदाता समिती
/ सामाजिक कार्यकर्ता

